महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, ८ खासदारांची ठाण्यात गुप्त बैठक? शिंदेंचे 'ऑपरेशन टायगर' सक्रिय
ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या काही खासदारांमध्ये गुप्त चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करण्यासाठी शिंदे पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू आहेत. पण त्याचवेळी दिल्लीतील नेतृत्वाकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नसल्याचेही बोलले जात आहे. पण एकनाथ शिंदे वैयक्तिक पातळीवर ठाकरे गटाच्या खासदारांशी सातत्याने संपर्कात असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व खासदारांकडून निष्ठेची ग्वाही घेतली होती. मात्र, या ताज्या घडामोडींमुळे ठाकरे गटात पुन्हा एकदा खळबळ माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आठ खासदारांची एक गुप्त बैठक झाली. एकनाथ शिंदेंची गाडी अचानक त्यांचा ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात एकनाथ शिंदे आणि ठाकरके गटाच्या खासदारांची भेट झाली. ही बैठक पहाटेपर्यंत सुरू होत. तसेच खासदार श्रीकांत शिंदेहेदेखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे.
तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, संजय दीना पाटील, नागेश आष्टीकर, संजय देशमुख, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौर हेदेखील या बैठकरीला उपस्थित होते. तर, खासदार ओमराजे निंबाळकर आणि इतर आणखी दोन खासदारांशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.या बैठकीत शिंदेंनी ठाकरे गटाच्या खासदारांना आपल्या शिवसेनेत सामील होण्याची ऑफर दिल्याचीही माहिती आहे.
याबाबत ठाकरे गटाच्या खासदारांना ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंत यांना संपर्क साधल्यानंतर अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे सांगत हे वृत्त फेटाळून लावले आहे. “काहीही झालं तरी मी शिंदेंसोबत जामार नाही.’ असं अरविंद सावंत यांनी सागितलं. तर ‘मी दोन टर्मचा खासदार असून तेव्हापासून हीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोणत्याची चुकीच्या बातमीवर मी स्पष्टीकरण देणार नाही, अशी कुठली बैठक झाल्याचं मला माहिती नाही, बैठक झाली असेल तर फोटो द्यावेत’ असे खुले आव्हान ओमराजे निंबाळकर यांनी दिले आहे.
तर यवतमाळ-वाशिमचे लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनीदेखील या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे, मी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन बैठकीला उपस्थित नव्हतो, या बैठकीला उपस्थित नव्हतो, ना मला या बैठकीचे निमंत्रण होते. ना कोणी मला बोलावले होते. त्यामुलए या बैठकीला जण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि मी गेलेलो नाहीय.’






