…तर संसदेत तीव्र पडसाद उमटतील; शरद पवारांचा इशारा

शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. दिल्लीच्या चार सीमांवरही शेतकऱ्यांचा वेढा आजही कायम आहे. थंडीवाऱ्यातही शेतकऱ्यांचे तीव्र स्वरूपात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आत्तापर्यंत जवळपास दोनशे शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. देशाचा अन्नदाता इतक्या प्रदीर्घ काळासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. याबाबत शरद पवारांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला सुनावले आहे.

    पुणे : कृषी कायद्यासंदर्भात प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशी स्थिती देशाच्या संसदेची झाली आहे. केंद्र सरकारने निर्णय न घेल्यास सोमवारी याचे तीव्र पडसाद संसदेत उमटतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

    शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. दिल्लीच्या चार सीमांवरही शेतकऱ्यांचा वेढा आजही कायम आहे. थंडीवाऱ्यातही शेतकऱ्यांचे तीव्र स्वरूपात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आत्तापर्यंत जवळपास दोनशे शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. देशाचा अन्नदाता इतक्या प्रदीर्घ काळासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. याबाबत शरद पवारांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला सुनावले आहे.

    शेतकऱ्यांच्या भूमिकेसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका न घेतल्यामुळे संसदेचे कामकाज बंद पडले. या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तसेच संसददेखील अस्वस्थ आहे. त्यामुळे याबाबतची प्रतिक्रिया सोमवारच्या कामकाजात नक्की उमटेल. सध्या शेतकरीवर्गाची स्थिती नाजूक आहे. कधी नव्हे ते राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. मात्र, राज्य सरकार या सर्व अडचणींमधून नक्कीच मार्ग काढेल असेही पवार म्हणाले.